डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

तुम्हीही रात्री उशीरा जेवताय का? वेळीच सावध व्हा

 अनेकांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण करणं शक्य होत नाही. परंतु ते किती धोकादायक असू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे. वेळेवर अन्न न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनातून असे दिसून आले की, दर तासाला 6 टक्क्यांनी वाढतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील एक तृतीयांश लोकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे आहार आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासानुसार, 2019 मध्ये एकूण 1.86 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू केवळ आहारामुळे झाला. म्हणजेच वेळेवर अन्न न खाणे आणि संतुलित आहाराचा समावेश आपल्या दैनंदिन दिनचर्येत न केल्याने मोठे आजार होऊ शकतात.



उशिरा खाणे म्हणजे हृदयविकाराचा धोका

फ्रेंच संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार, दिवसाचे पहिले जेवण उशीराने केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. म्हणजेच वेळेवर जेवणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत 1 तास उशीरा जेवणाऱ्या व्यक्तीच्या हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे.

या अभ्यासानुसार दिवसाचे पहिले जेवण (नाश्ता) सकाळी 8 वाजता केले पाहीजे. तर दुपारचे जेवण 12 ते 1 वाजेच्या दरम्यान करा. तर संध्याकाळी 5 वाजता नाश्ता करा. आणि रात्री ८ वाजेपर्यंत रात्रीचे जेवण करुन घ्यावे. प्रत्येक सलग दोन मीलमध्ये सरासरी वेळेत फरक आहे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने जास्त खाण्याची समस्या टळते. 


जेवणाच्या वेळा चुकल्यास शरीरावर काय परिणाम? 

- नाश्ता वेळेत नाही केला तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

 - एक तास उशिरा जेवल्याने सेरेब्रोव्हस्कुलर आजारांचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो.

- रात्री 9 नंतर जेवण केल्याने सेरेब्रोव्हस्कुलर आजाराचा धोका 28 टक्क्यांनी वाढतो.

- रात्री लवकर जेवल्याने या आजारांचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो.

साभार

Zee News 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक