श्री श्री रविशंकर यांचे प्रेमाबद्दल 10 अनमोल विचार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्री श्री रविशंकर यांचे प्रेमाबद्दल 10 अनमोल विचार
एखाद्या गोष्टीची लालसा नैराश्य, दु:ख, कष्ट यासारख्या समस्या घेऊन येतात. पण खरे प्रेम या सर्वांपासून विभक्त आहे
भीतीमध्ये प्रेमाची कमतरता आहे. भीती फक्त एकच गोष्ट घालवू शकते ,आणि ते म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे आपल्या शेजारील व्यक्तिमध्ये ईश्वराला पाहणे, आणि ध्यान म्हणजे स्वतः मधील ईश्वराला पाहणे होय.
खोल प्रेमात तुमचे मन विचारांपासून मुक्त असते.
प्रेमात तुम्ही कशाचीही अपेक्षा करत नाही. जर तुम्हाला त्या बदल्यात काही हवे असेल तर त्याला प्रेम म्हणू नका.
प्रेमाला नाव दिलं की ते नातं बनतं आणि प्रेमाला मर्यादा येतात.
प्रेम करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कोणीतरी तुमच्यावर प्रेम करावे असा आग्रह देखील धरू नका.
जेव्हा प्रेम विकृत होते तेव्हा ते लोभ, मत्सर, भय आणि द्वेष बनते.
लक्ष देणे म्हणजे प्रेम नव्हे. खरं तर, जेव्हा भरपूर प्रेम असते तेव्हा लक्ष नसते.
काळजी हा प्रेमाचा शत्रू आहे. आपण एकाच वेळी प्रेमात आणि काळजीत पडू शकत नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा