डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

परीक्षांच्या काळात मुलांच्या मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी; तणाव दूर करण्यासाठी खास टिप्स

 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत तर आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत.

या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काही विद्यार्थ्यांना ताण-तणाव देखील जाणवतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? त्याबदद्ल आज आम्ही खास टिप्स सांगणार आहोत.



सोशल मीडियापासून ठेवा अंतर

आजकाल अनेक मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जणांना मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याची जणू सवयच लागली आहे. अनेक पालकांना असे वाटते की, किमान परीक्षांच्या कालावधीमध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने सोशल मीडियापासून अंतर ठेवावे. हे अगदी योग्य देखील आहे.

परंतु, अशा स्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांवर सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचा दबाव टाकू नये. यामुळे, मुले नैराश्यात जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये पालकांनी मुलांचे एक रूटीन बनवावे. या कामी पालक त्यांच्या मुलाचे मित्र किंवा शिक्षकांची देखील मदत घेऊ शकतात. 

पालकांनो मुलांसोबत वेळ घालवा

वर्षभर मुलांनी परीक्षेची तयारी केलेली असते. अभ्यास देखील केलेला असतो. मात्र, अनेक पालक बोर्डाच्या परीक्षा जवळ येताच मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. जे अत्यंत चुकीचे आहे. अशा स्थितीमध्ये उलट पालकांनी मुलांसोबत एक मित्र म्हणून संवाद साधवा. तुमचा मुलगा किंवा मुलगी तणावात असेल, तर त्यांना समजावून सांगा. या दरम्यान मुलांसोबत वेळ घालवा, त्यांना अभ्यासामध्ये मदत करा.

परीक्षांच्या काळात काय करावे आणि काय करू नये ?

  • पालकांनी घरात शक्य तितके सकारात्मक वातावरण ठेवावे.
  • घरात कोणतेही भांडण किंवा वाद-विवाद करू नये.
  • काही काळासाठी सोशल मीडिया किंवा मनोरंजनाची माध्यमे बंद करा किंवा त्याची एक निश्चित वेळ ठरवा.
  • मुलांना अभ्यासासाठी प्रेरित करा त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नका.
  • तुमच्या मुलाची किंवा मुलीची इतर मुलांसोबत अजिबात तुलना करू नका.
  • मुलांना त्यांच्या विषयांची उजळणी करण्यास मदत करा.
साभार 
सकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक