अनोखे व्यक्तीमत्व
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मित्रांनो ,आज फेसबुकवर मला देवा धर्माच्या गोष्टी या ग्रुप वर श्याम दुसाने यांची एक छान पोस्ट वाचण्यात आली तीच येथे देत आहे.
27वर्षात दहा बारा लाख कँन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाही..
पण गेल्या 27वर्षात कँन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला
तो हरखचंद सावला यांच्या रुपात,
मुंबईच्या परळ भागातुल प्रसिद्ध टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन पाहत राहायचा.
मृत्युच्या दारात उभा राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावरील दिसणारी ती भीती,
त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा
बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहुन आलेले गारीब लोक असायचे.कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे.
औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे.
ते सार दृष्य पाहुन तो तरुण खिन्न मनाने घरी परतायचा..
आणि शेवटी याच तरुणाने एक मायेचे पाऊल उचलले..
त्याचे एक चांगल हाॅटेल भाड्याने देऊन त्याच पैशातुन त्याने त्या हाॅस्पिटलसमोर कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर एक यज्ञ सुरु केला जो पूढे 27वर्षे चालुच राहिला,
तेथील जनतेला सुद्धा हा ऊपक्रम आवडला आणि त्यांनीही हातभार लावला
ते एवढेही करुन थांबले नाही त्यांनी रुग्णांना मोफत औषध पुरवायलाही सुरवात केली.त्यासाठी त्यांनी औषधांची बँकच उघडली त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डाॅक्टर अन वर्कची टिमच त्यांनी स्थापन केली.
आज त्यांनी स्थापन केलेला जिवन ज्योत ट्रस्ट साठ हून अधिक उपक्रम राबवत आहे,
अशा या सत्तावन्न वर्षिय मा.हरखचंद सावला यांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम।
साभार
श्याम दुसाने
फेसबुक पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा