पालकांनो, मुलं परीक्षेचा सतत ताण घेताय, चिडचिड करताय? कशी घ्याल काळजी?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. काही मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील. अशावेळी मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
परीक्षेच्या काळात पालकांची मुलांबाबत काही वेगळी भूमिका असते. मुलांना चांगले मार्क्स मिळावे म्हणून पालक अधिक मागे लागतात. त्यामुळे मुलांचा (Child) अभ्यास नीटसा होत नाही. अभ्यासाच्या दबावामुळे मुले अधिक चिडचिड करु लागतात. अशावेळी पालकांनी अधिक शांत आणि संयमाने वागायला हवे. तसेच काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी. जाणून घेऊया पालकांनी काय काळजी घ्यायला हवी.
1. तुलना नको
बरेचदा पालक इतर मुलांशी आपल्या मुलांची तुलना करतात. ज्यामुळे त्यांची बौद्धिक पातळी, तार्किक क्षमता आणि गुण कमी होतात. आपल्या मुलांची त्यांच्या मित्रांशी, भावंडांशी किंवा त्याच्या वयाच्या इतर मुलांशी तुलना करु नका. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो.
2. ब्रेकही महत्त्वाचा
दिवसभर अभ्यास करताना मुलांना कंटाळा देखील येतो. परीक्षेच्या (exam) काळात मुलांना नेहमी जास्त अभ्यास करावा लागतो. परंतु, या दरम्यान ब्रेक घेणे देखील जास्त गरजेचे आहे. यामुळे मुलांना फ्रेश वाटेल. पालकांनी अशावेळेस मुलांशी गप्पा मारायला हव्या किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी किमान तासभर तरी करु द्यायला हव्या.
3. विश्वास ठेवणे
अनेकदा पालक मुलांचा चांगला विचार करतात परंतु, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यामुळे त्याच्या नात्यात दूरावा येतो. दोघांमधील अंतर वाढत जाते. यासाठी त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा.
4. घरातील वातावरण
घरातील वातावरण चांगले असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आहे की, नाही हे देखील पाहा. घरातील वादविवाद मुलांसमोर आणू नका त्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो.
साभार
साम Tv
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा