डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

रात्री उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहणाऱ्यांमध्ये वाढत चाललेल्या या आजाराबद्दल जाणून घ्या व सावध व्हा

आजकाल मोबाईल, संगणक आदींचा उपयोग कामापेक्षा करमणुकीसाठी देखील जास्त प्रमाणात वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर रील्स, वेबसिरीज पाहणे अथवा गेम्स खेळणे असे प्रकार सध्या केला जात आहेत.

अनेकांना हे खेळण्याचे व्यसनच जणू जडले आहे. तासनतास मोबाइलमध्ये घालविल्यामुळे पुरेशी झोप होत नाही. यातून तणाव वाढतो. कालांतराने झोपेचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही.

अशा स्थितीत एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा अजार होण्याचा धोका बळावतो. या आजारामुळे मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात व या मुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो असे म्हटले जाते.

हातपायांना मुंग्या येतात, मानसिक संतुलन बिघडते आदी स्वरूपाचा त्रास वाढतो. हा टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक जुना आजार आहे.

या आजाराचे वेगवेगळी लक्षणे आहेत. वेळीच उपचार घेतले तर हा आजार औषधांनी बर होतो. अन्यथा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. धावपळीचे जीवन, वाढता तणाव, व्यसन, असंतुलित आहार यासह रात्री उशिरापर्यंत जागणे आदी कारणांमुळे या आजारांचा धोका वाढतो. कोणत्याही वयोगटातील रुग्णाला हा आजार होऊ शकतो.




एपिलेप्सी आहे तरी काय ?

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून याने मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाची शुद्ध हरपते, फिट येते, मूड बदलणे आदी स्वरूपाचे लक्षणे दिसतात.


असे सांभाळा स्वतःला

  • दररोज पुरेशी झोप घ्यावी.
  • नियमित व्यायाम करावा.
  • व्यसनापासून दूर राहावे.
  • संतुलित आहार घ्यावा.
  • तणाव व्यवस्थापन
  • टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर पाहणे कमी करावे

या सवयी पडतील महागात :-

रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहणे ही अतिशय घातक सवय आहे. यामुळे पुरेशी झोप होत नाही. यामुळे पोटाचे विकार वाढतात, तणाव निर्माण होतो, डोळे जळजळ करतात.

किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आते. बहुतांशी जण मात्र विविध कारणांमुळे पुरेशी झोप घेत नसल्याने त्यांना शारीरिक व मानसिक आजारांचा सामना करावा लागतो.

News Credit:

अहमदनगरLive 24


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक