डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

Board Exam Tips: आजच बदला या 5 सवयी, बोर्डाच्या परीक्षेत कराल टॉप

 दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विविध शिक्षण मंडळांमधून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. SSC, HSC, CBSE, UP, ICSE, ISC सह अनेक बोर्डांच्या परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार आहेत.



10वी, 12वी बोर्ड परीक्षा 2024 ला बसलेल्या विद्यार्थ्यांनी या दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करणं महत्वाचं आहे. यातच जर तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या सवयी आणि तयारीच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील.


या टिप्स ठेवा लक्षात 

बोर्ड परीक्षेत टॉपर होण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त खाली नमूद केलेल्या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी असलात तरी या 5 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही परीक्षेत टॉप करू शकता.

1. अभ्यास करण्यास टाळाटाळ करू नका: 

बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी उद्याचा अभ्यास पुढे ढकलण्याच्या सवयीपासून दूर राहा. बरेच विद्यार्थी ही चूक करतात. शेवटच्या क्षणी काहीही अभ्यास करण्यापेक्षा परीक्षेच्या काही दिवस आधी अंतिम उजळणी केल्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी ताण येणार नाही.

2.अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या: 

बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे (Board Exam Syllabus) लक्ष न दिल्यास काही महत्त्वाचे विषय किंवा माहिती चुकू शकते. अभ्यास करताना नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा.


3. वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे:

एसएससी, एचएससी, सीबीएसई, आयसीएसई, आरबीएसईच्या कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन करा. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि प्रत्येक विषयाकडे समान लक्ष द्या

4. सोशल मीडियापासून दूर राहा:

 प्रत्येकाला सोशल मीडियावर वेळ घालवणे आवडतं. पण सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही. अशातच तुम्ही वेळ वाया न घालवता त्याऐवजी तुमच्या वेळेची अभ्यासात गुंतवणूक करू शकता. जेणेकरून परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील.

5. तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या सवयींमध्ये सुधार करा: 

बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा. या काळात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवण्याचा धोका पत्करू शकत नाही. एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी 7-8 तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.

साभार

साम Tv


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक