डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार श्रवणयंत्र, व्हीलचेअर आणि बरच काही.; सरकारच्या 'या' योजनेसाठी लवकर करा अर्ज

केंद्र सरकारने वृद्धांना आधार देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. वृद्धांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यात त्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.



ज्यांना वृद्धापकाळात शारीरिक अपंगत्व आले आहे.ज्यांना बघायला, ऐकायला आणि चालायला आधार लागतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. अशा वृद्धांसाठी सरकार ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ राबवत आहे. या योजनेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

जर तुम्हालाही राष्ट्रीय वयोश्री योजना बद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना काय आहे आणि कोणत्या वर्गातील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि तुम्ही अर्ज कसा करू शकता याबद्दलची माहिती सांगणार आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजना 2017 मध्ये सुरू झाली :

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2017 रोजी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली.

– तेव्हापासून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. ही योजना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केली आहे.

- ज्याची सुरुवात आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून झाली. याद्वारे शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गातील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.

या’ श्रेणीतील ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात :

– केंद्र सरकारच्या या वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक श्रेणी निश्चित केली आहे.

– या वर्गवारीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. ही मोफत साधने या योजनेद्वारे मिळू शकतात.

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ : Rashtriya Vayoshri Yojana 

– वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे. ज्यांच्याकडे बीपीएल, एपीएल कार्ड आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


हे दस्तऐवज आवश्यक आहे :

– वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये आधार कार्ड, शिधापत्रिका, ओळखपत्र, पेन्शन, अपंगत्वाचा वैद्यकीय अहवाल, प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.


लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल :

– राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून समाज कल्याण विभागाची https://www.alimco.in/ वेबसाइट उघडावी लागेल. 

- या वेबसाईटवरून नोंदणी फॉर्म भरावा लागेल. वेबसाइटवर फॉर्म उघडा आणि त्यात विचारलेली माहिती भरा.

– यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर फॉर्म सबमिट करा.

‘हे’ उपकरण तुम्हाला मोफत मिळेल :


ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. चाचणीनंतर पात्र ठरल्यास, तुम्हाला वॉकिंग स्टिक, एल्बो क्रॅचेस, वॉकर क्रॅचेस, ट्रायपॉड क्वाडपॉड, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कृत्रिम दात आणि चष्मा यासह आवश्यक सहाय्यक उपकरणे मोफत मिळतील.

News Credit:

प्रभात 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक