भारतातील लठ्ठपणा ची समस्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपल्या समाजात अनेक महिला, पुरुष व मुलं जाड किंवा लठ्ठ आहेत पण लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणं ही तेवढं च अवघड आहे . लठ्ठपणामुळे या सर्वांना इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. भारतात लठ्ठपणा गंभीर आजार आहे. भारतात पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये या विकाराचं प्रमाण सर्वाधिक आहे.
आपल्या देशात लठ्ठपणा या विकाराने ग्रासलेल्या भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. पाच ते 19 वर्षांच्या 6 कोटी 30 लाख मुलांना लठ्ठपणा हा विकार आहे. 20 वर्षांवरच्या 15 कोटी 80 लाख व्यक्ती लठ्ठ आहेत. केरळमध्ये 65.4 टक्के तर पंजाबमध्ये 62.5 टक्के नागरिकांना लठ्ठपणा हा विकार आहे. दिल्लीत हे प्रमाण 59 टक्के तर एवढं आहे. तमिळनाडूत 57.9 टक्के नागरिक लठ्ठ आहेत.
लठ्ठपणाचा संबंध केवळ वजनाशी नसून संपूर्ण आरोग्याशी आहे. लठ्ठ व्यक्तींना अनेक गंभीर आजार असतात किंवा होऊ शकतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह, चयापचयाच्या समस्या, तसंच मानसिक विकारही या व्यक्तींमध्ये आढळण्याची शक्यता असते. त्यामुळेच नियमित व्यायाम, चौरस आहार आणि विश्रांती यांचा दिनचर्येत समावेश करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
सर्व वयोगटातल्या व्यक्तींनी लठ्ठपणा टाळण्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. अतिरिक्त मैदा, फॅट, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, पाकिटांमधून आणि बाटल्यांमधून विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि शीतपेयं यांचा आहारातला वाढलेला समावेश, कामाच्या ठिकाणी वाढलेल्या स्पर्धेमुळे निर्माण झालेले ताणतणाव अशा अनेक गोष्टी लठ्ठपणाला पूरक ठरतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा