डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

चांदीचे दागिने वापरण्याचे शास्त्रीय फायदे



उष्णतेचा त्रास कमी होतो

चांदी थंड असते, त्यामुळे चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठी चांदी खूप फायदेशीर ठरू शकते, शिवाय यामुळे आपले संपूर्ण आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

त्वचा चमकदार होते

चांदीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. तसेच चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मदेखील असतात, जे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करू शकतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आपल्याला दूर ठेऊ शकतात.

राग नियंत्रणात राहतो

चांदीचे दागिने वापरल्याने व्यक्तीचे मन शांत राहते; ज्यामुळे तणाव, चिंता आणि रागही नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे झोपही चांगली लागू शकते.

चांदीचे दागिने केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीदेखील तितकेच फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं, यात तुम्ही चांदीची चैन, अंगठी, ब्रेसलेट, कडा यांचा वापर करू शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे दागिने वापरण्याचे फायदे

हिंदू धर्मात सोन्याइतकंच चांदीच्या दागिन्यांनादेखील खूप शुभ मानले जाते. शिवाय चांदी साक्षात देवी लक्ष्मीलादेखील खूप प्रिय आहे, ज्यामुळे चांदीचे दागिने वापरल्याने देवी लक्ष्मीचादेखील आशीर्वाद प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

चांदीवर चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचे प्रभुत्व असते. त्यामुळे चांदीच्या नियमित वापराने कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो, तेव्हा त्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यातील मानसिक तणाव, अशांती, नकारात्मकता, वाईट विचार दूर होण्यास मदत होते. तसेच जेव्हा कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, पैसा येण्यास सुरुवात होते असे मानले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक