डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक

उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक

आजच्या बदललेल्या वेगवान जीवनशैलीत आहार, व्यायाम, करमणुकीची साधने, ध्वनीप्रदूषण, ताणतणाव अशा बदलांमुळे बहुसंख्यांच्या झोपेवर परिणाम झाले आहेत.

आहारामधील जंकफूड, कॅफीनयुक्त पेये, एनर्जी ड्रिंक्स, चहा-कॉफीचे वाढते प्रमाण, पार्ट्या-समारंभांमध्ये आणि मित्रमैत्रीणींसोबतच्या भोजन समारंभांमध्ये होणारे अतिरिक्त मद्यपान या सगळ्यामुळे उत्तम झोप येण्यावर मर्यादा आल्या आहेत.

कामाचे तास अनिर्बंध झाल्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये येण्या-जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी वाहनेच वापरल्यामुळे जवळच्या अंतरावर चालत जाण्याची शारीरिक हालचाल टाळली जाते. जिन्यांवरील चढउतार टाळण्यासाठी लिफ्ट आणि सरकते जिने वापरले जातात. शरीराची हालचाल मर्यादित झाल्यामुळे, शारीरिक थकव्यामुळे 'झोप येणे' हा अनुभव येणे संपुष्टात आले आहे.

दैनंदिन व्यवहारात आणि करमणुकीच्या साधनांमध्ये संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रेलचेल आहे. मोबाईल फोन, टेलिव्हिजन, संगणक, लॅपटॉप, टॅब्ज यांचा वापर छोट्या मुलांपासून जख्ख वृद्धांपर्यंत सर्रास होत आहे. या उपकरणांमधील किरणोत्सर्गाचा परिणाम शरीरात झोप आणणाऱ्या मेलॅटॉनिनसारख्या हार्मोनवर होऊन, उशीरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे.


काही वेळेस, आधुनिक जीवनाचा हा सुसाट वेग, थोडेसे थांबण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळच देत नाही. त्यामुळे नियमितपणे शांत-निवांत झोप मिळणे हे दुर्लभ स्वप्नासारखे वाटायला लागते. पण उत्तम आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची असते.

उत्तम झोप मिळाल्याने मेंदूची कार्यक्षमता, मनाचा मूड आणि शरीराचे आरोग्य सुधारते. मात्र पुरेशी, दर्जेदार आणि नियमितपणे झोप मिळाली नाही, तर अनेक आजार आणि विकारांचा धोका वाढतो. या आजारांच्या यादीत हृदयविकार, अर्धांगवायूपासून ते लठ्ठपणा आणि स्मृतिभ्रंशापर्यंत अनेक गंभीर आजारांचा समावेश होतो.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक