डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

रागावरील नियंत्रण

 Anybody can become angry - that is easy; but to be angry with the right person, and to the right degree, and at the right time, and for the right purpose, and in the right way - that is not within everybody's power and is not easy.'

आत दबलीय निराशा, असुरक्षितता; व्यवस्थेविषयीचा, स्वत:विषयीचा राग. मग लाव्हा सारखा बाहेर येतो. क्रोधाच्या, आक्रमकतेच्या रूपात. तेल ओतायला आजूबाजूला सवंग करमणूक आहेच. विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, काहींच्या बाबतीत त्या भावना दाबाव्या लागणं, सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना. स्पर्धात्मक वातावरणाचा ताण आहेच.

मग शिक्षण असो, नोकरी असो वा व्यवसाय असो. 'अपेक्षेप्रमाणेच सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब. खरं सुख भौतिक सुखातच आहे. मी ते मिळवीनच. दिलं तर सरळ, नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं,' अशी मानसिकता आज दुर्दैवानं अनेक तरुणांची झाली आहे. क्रोधातून काहीजणांच्या हातून घडणारे गुन्हेही वाढले आहेत.

सगळ्यांच्याच हातून टोकाच्या गोष्टी घडताहेत असं नाही; पण एकूणच युवावर्गात राग अति येण्याचं आणि तो चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरिक सुखाची व्याख्या चुकतेय. आनंद आणि मन:शांतीसाठी रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हे म्हणूनच समजून घ्यायला हवं. रागासारख्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवला, तर तरुणांच्या हातून सृजन घडेल, समाजस्वास्थ्य वाढेल.

'राग' ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. बहुतेक वेळा ती, अपेक्षाभंग, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, नैराश्य्य, मनाविरुद्ध वागणारी माणसं वगैरेबद्दलची आपल्याकडून व्यक्त होणारी सहज बचावात्मक प्रतिक्रिया (Defence Mechanism) असते. राग संयमितरीत्या, योग्य वेळी, योग्य प्रमाणात, शांतपणे व्यक्त करता येत नसेल, तर त्याचे परिणाम स्वतःसाठी अत्यंत घातक होऊ शकतात.

रागाचे शारीरिक परिणाम : 

रक्तदाब वाढणं, नाडीची गती अनियंत्रित होणं, हृदयावर अनिष्ट परिणाम (कारण भावना व हृदय ह्यांचा थेट संबंध आहे), निद्रानाश, डोकेदुखी, पित्त व पचनाच्या तक्रारी,अतिरिक्त प्रमाणात हानिकारक संप्रेरकं स्रवणं इत्यादी. मानसिक परिणाम : स्मृतिभ्रंश, विचारांचा गोंधळ, आत्मविश्वास व एकाग्रता कमी होणं, नैराश्याच्या आजाराकडे वाटचाल.

मानसिक परिणाम : 

स्मृतिभ्रंश, विचारांचा गोंधळ, आत्मविश्वास व एकाग्रता कमी होणं, नैराश्याच्या आजाराकडे वाटचाल.

गौतम बुद्धांनी म्हटलं आहे, की व्यक्त न झालेला क्रोध हा हातात घेतलेल्या जळत्या निखाऱ्यासारखा असतो. तो फेकून दिला नाही, तर स्वतःचाच हात भाजतो. क्रोधाच्या भावनेला ventilation मिळायला हवं; पण योग्य रीतीनं. राग बहुदा दोन प्रकारे हाताळला जातो. दाबून ठेवून किंवा एकदम जागच्या जागी त्याक्षणी जोरदारपणे व्यक्त करून. दोन्ही पद्धती चुकीच्या, घातक आहेत.

मग योग्य पद्धत कुठली? तर, राग येईल त्या क्षणी शांत राहून, घडलेल्या घटनेचा विचार करून कालांतराने शांतपणे, योग्य सुसंस्कृत प्रकारे त्या व्यक्तीला आपला विचार, भावना सांगणं. हे प्रत्यक्षात जमवायचं कसं? त्यासाठी एकूणच राग येण्याची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. त्याच्या मुळापर्यंत जायला हवं. आवश्यक तर तज्ज्ञांचं साह्य घ्यायला हवं; पण रागावर नियंत्रण ठेवणं शिकायलाच हवं.


रागनियंत्रणासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • माझ्या भावनांवर माझा पूर्ण ताबा असायला हवा. हे घडू शकतं यावर विश्वास हवा. माझ्यात बदल घडायला हवा ही अत्यंत प्रामाणिक इच्छा हवी.
  • आयुष्यामध्ये अनेक गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडणार आहेत आणि त्या मी स्वीकारायला हव्यात.
  • मी परिपूर्ण नाही. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. तशाच चुका इतरांकडूनही होऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना क्षमा करायला हवी.
  • माझ्या भावना मी शांतपणे, न चिडता; पण ठामपणे व्यक्त केल्या, तर माझं परिस्थितीवर नियंत्रण राहू शकतं आणि परिणाम मला हवा तो होऊ शकतो. यानं माझं मन:स्वास्थ्य टिकू शकतं आणि क्रोधामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टळू शकतात.
  • आक्रस्ताळेपणा किंवा हिंसेची इच्छा म्हणजे
  •  पौरुषत्व नव्हे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक